इंदिरा आवास योजना l Indira awas yojana
Indira awas yojana (इंदिरा आवास योजना) ही 1989-1995 पर्यंत जवाहर रोजगार योजना म्हणून ओळखली जायची. त्यानंतर 1996 मध्ये ही योजना पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे.
2010 मध्ये ही इंदिरा आवास योजना या नावाने आंमलात आणली. या योजनेचा निधी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या तर्फे देण्यात येतो. ज्याचा मध्ये 75 टक्के केंद्र शासन निधी देते आणि 25 टक्के राज्य शासन निधी देते.
Table of Contents
इंदिरा आवास योजना म्हणजेच लोकांना घर देणे यासाठी सरकारची वचनबद्धता आणि भारताच्या सर्वात प्रमुख महिला नेत्याला श्रद्धांजली म्हणून इंदिरा गांधी यांच्या नावाने “इंदिरा आवास योजना” राबवण्यात येते.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन राहणीमान सुधारण्यास खूप मदत झाली आहे. त्यामुळे देशाच्या विकासामध्ये एक चांगला हातभार लागला आहे.
इंदिरा आवास योजना हे शीर्षक भारतातील ग्रामीण लोकांना घरे बांधून देण्यासाठी सरकारची असलेली बांधिलकी दर्शवते. या योजनेचा लाभ घेऊन बरेच ग्रामीण जीवन सुधारले आहे आणि त्यामुळे देशाची विकासाची आणि प्रगतीची वाटचाल यामध्ये सरकारचा एक चांगला मोठा हातभार या योजनेद्वारे ग्रामीण जनतेला लाभला आहे.
ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जी बेघर झालेली कुटुंबे आहेत, अशा कुटुंबांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे. अशा कुटुंबांना घर बांधून देण्यासाठी त्यांना या योजनेद्वारे योग्य ते अनुदान दिले जाते. या योजनेसाठी ग्रामपंचायत मध्ये बेघर कुटुंबाच्या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे.
Indira awas yojana या योजनेमध्ये जो निधी जमा केला जातो त्या निधी मधील 40 टक्के अनुदान हे अनुसूचित जातींसाठी राखून ठेवण्यात आले आहे. अपंगासाठी Indira awas yojana मध्ये तीन टक्के अनुदान देण्यात येते, तर अल्पसंख्याकांसाठी 15 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे.
केंद्र शासनाद्वारे दरवर्षी घर बनवण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात येते, तसेच जिल्हा आणि ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे जिल्ह्यांना घरकुलांचे वाटप करण्यात येते. यामध्ये राज्याला कोणताही हस्तक्षेप किंवा बदल करता येत नाही. केंद्र शासनाने निश्चित केलेल्य उद्दिष्टांची पुर्तता ही जिल्हा व प्रकल्प संचालकांच्या मार्फत पूर्ण करण्यात येते. इंदिरा आवास योजना ही प्रधानमंत्री आवास योजने मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
शासकीय माहिती लिंकवर क्लिक करा.
माहिती सर्वांना शेअर करा जेणेकरून इतरांना ही ह्या माहितीचा लाभ घेण्यास मदत होईल.