सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना l Savitribai Phule Shishyavrutti Yojana
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai Phule Shishyavrutti Yojana) ही भटक्या जमाती व मागासवर्गीय जातीतील खास मुलींसाठी ही योजना सरकारने लागू करण्यात आली आहे.
आपण पाहतो की अजून देखील मागासवर्गीय समाज आणि भटक्या जमाती तितकासा सुधारलेला नाही शैक्षणिक अभाव असल्यामुळे लोकांमध्ये शिक्षणाविषयी तितकेसे महत्त्व नाही त्यामुळे रोजगाराचा देखील या लोकांसाठी तुटवडा आहे शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी व मुलींनी शाळेमध्ये यावे म्हणून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळांमध्ये गळतीचे प्रमाण अधिक आढळून येते. परिणामी पालकांमध्ये मुलींना शाळेत पाठवण्याची प्रवृत्ती वाढण्याच्या हेतूने इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देण्याचा शासनाने निर्णय 1996 रोजी घेण्यात आला.
या धर्तीवर आठवी ते दहावी शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai Phule Shishyavrutti Yojana) 2003 रोजी शासनाने कार्यान्वित आणली.
पालकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती देखील हलाकीची असल्यामुळे पालकांना मुलांना रोजगारासाठी म्हणून शेतावर घेऊन जातात किंवा इतरत्र कामासाठी मुलांना रोजगारावर लावतात.
ह्या गोष्टी लक्षात घेऊन मुलींसाठी पालकांमध्ये शाळेमध्ये पाठवण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. 2003 पासून ही योजना लागू करण्यात आली.
विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील मुलींसाठी 2003-2004 या शासन वर्षापासून या योजनेच्या अंमलबजावणी करण्यात आली. सदर योजनेची अटी खालीलप्रमाणे – उत्पन्न व गुणाची अट नाही, विद्यार्थ्यांनीची उपस्थिती नियमित असणे आवश्यक आहे.
Savitribai Phule Shishyavrutti Yojana योजनेचे स्वरूप –
पाचवी ते सातवी विद्यार्थ्यांसाठी दरमहा साठ रुपये.
आठवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी दरमहा शंभर रुपये.