शेतमाल तारण योजनेची वैशिष्ट्ये I Shetmal Taran Yojana Chi Vaishishte
शेतमाल तारण योजनेची प्रमुख उद्दिष्टे (Shetmal Taran Yojana Chi Vaishishte) म्हणजे शेतकऱ्यांना योग्य तो बाजार भाव मिळवून देणे हे आहे.
Table of Contents
शेतमाल तारण योजना ही गरीब शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे. सर्व शेतमाल जो शेतामध्ये पिकवलेला असतो, तो ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे शेतमाल शेतकरी बाजारपेठेमध्ये लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.
पण त्यांना त्यामुळे योग्य ती किंमत मिळत नाही आणि शेतकरी नाराज होतो. परंतु तारण कर्ज योजनेमुळे शेतकरी आता तो शेतमाल बाजार समितीकडे ठेवून त्याद्वारे चांगला बाजार भाव मिळवून आपली प्रगती करू शकतो.
त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळत आहे, जेणेकरून त्यांनी जो शेतमाल कष्ट करून पिकवला आहे त्या मालाला चांगला भाव मिळवता येईल यासाठी सरकारने एक चांगला उपक्रम सुरू केला आहे.
शेतमाल तारण योजनेची वैशिष्ट्ये [Shetmal Taran Yojana Chi Vaishishte]
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत जे शेतकरी स्वतः शेतमाल पिकवतात त्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा या योजनेअंतर्गत शेतमाल स्वीकारण्यात येतो. त्यामुळे जर कोणी व्यापारी असेल तर व्यापाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवशीच्या असलेल्या बाजारभावाप्रमाणे किंवा शासनाने ठरवलेल्या खरेदी किंमतीनुसार जी कमी असेल ती ठरवण्यात येते.
- तारण कर्जाची मुदत ही सहा महिने म्हणजेच 180 दिवस आहे आणि याचा व्याजदर 6% असा आहे. 180 दिवसांमध्ये जर तारण कर्जाची परतफेड केली तर बाजार समिती मंडळाकडून एक ते तीन टक्के व्याज प्रोत्साहन पर अनुदान म्हणून देण्यात येते. कर्ज परतफेड न झाल्यास सवलत मिळत नाही.
- व्याजामध्ये तारण कर्जाचे विविध मुदतीमध्ये जर कर्जाची परतफेड झाली तर बाजार समितीकडून कृषी पणन मंडळातील 3 टक्के कर्ज कर्जामध्ये सवलत देण्यात येते, उर्वरित तीन टक्के व्याज बाजार समिती प्रोत्साहन पर अनुदान म्हणून देण्यात येते. मुदतीमध्ये कर्जाची परतफेड झाली नाही तर यामध्ये सवलत मिळत नाही.
- स्वनिधीतून बाजार समितीने जर तारण कर्जाचे वाटप केले तर त्या रकमेवर एक ते तीन टक्के व्याजामध्ये सवलत देण्यात येते.
- सहा महिन्यानंतर म्हणजे 180 दिवसानंतर सहा महिन्यापर्यंत आठ टक्के व्याजदर व पुढच्या सहा महिन्यात पर्यंत बारा टक्के व्याजदर करण्यात येतो.
- तारण ठेवलेल्या शेतमालाच्या साठवलेल्या शेतमालाची देखरेख व सुरक्षा बाजार समितीकडे देण्यात येते आणि बाजार समिती हे काम विनामूल्य करतात.
- तारण केलेल्या शेतमालासाठी विमा उतरवण्याची जबाबदारी बाजार समितीची राहते.
- राज्य किंवा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवर देखील बाजार समिती तारण कर्ज उपलब्ध करून देते.
अशाप्रकारे शेतमाल तारण योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले आहे शेतमाल तारण योजनेची वैशिष्ट्ये (Shetmal Taran Yojana Chi Vaishishte) पाहिल्यावर लक्षात येते की शेतकऱ्यांसाठी मदत करणे हे प्रमुख शासनाचे उद्दिष्ट आहे.