श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना l Shravan Bal Yojana
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (Shravan Bal Yojana) 65 ते 65 वर्षावरील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा राज्यांवरती वेतन योजनेमार्फत प्रतिमहा चारशे रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय शासनाने 2007 मध्ये घेतला. शिवाय याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान वेतन योजनेद्वारे देखील दोनशे रुपये प्रतिमहा निवृत्ती वेतन म्हणून दिले जाते.
Table of Contents
श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजनेसाठी (Shravan Bal Yojana) आवश्यक असणारी पात्रता –
दोन्ही योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
Shravan Bal Yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे वय 65 वर्षे किंवा 65 वर्षावरील असणे आवश्यक आहे.
ज्याचे कुटुंबाचे एकूण वार्षिक रुपये उत्पन्न 21000 च्या आत आहे. त्याच्या कुटुंबाच्या वर्षी उत्पन्न 21000 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
अशा व्यक्तींना श्रावणबाळ सेवा (Shravan Bal Yojana)या राज्य योजनेतर्फत निवृत्ती वेतन देण्यात येते. प्रतिमहा 600 रुपये इतके निवृत्तीवेतन वृद्धांना राज्य शासनाकडून देण्यात येते.
श्रावणबाळ योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 65 वर्षे किंवा 65 वर्षावरची ओलांडलेल्या वृद्धांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. पेन्शन योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र राहतील व त्यांची आर्थिक दृष्ट्या हाल होऊ नये म्हणून त्यांना थोडीशी मदत निवृत्ती वेतनाद्वारे सरकारतर्फे केली जाते.
ज्येष्ठ नागरिकांना काम करणे किंवा आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज आहे. जी महाराष्ट्र शासनातर्फे पुरविण्यात येते. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि त्यांना लागणाऱ्या काही खर्चासाठी दरमहा 600 रुपयाची सरकार मदत म्हणून त्यांच्या खात्यामध्ये योजनेअंतर्गत जमा करण्यात येते.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- निवृत्ती वेतन प्राप्त करण्यासाठी अर्जदाराने अर्जाच्या दोन प्रती व आवश्यक असणारे सर्व कागदपत्र तलाठ्याकडे द्यावे.
- तलाठ्याच्या मार्फत अर्जाची तपासणी करून व त्याच्या सोबत जोडलेले कागदपत्र सर्व व्यवस्थित आहेत की नाही व सविस्तर नोंदणी त्याप्रमाणे झाली आहे की नाही हे पाहून अर्जदाराला योजनेचा लाभ घेण्यासाठी तलाठ्याद्वारे पोहोच पावती देण्यात येते.
- ही पावती व अर्ज तहसीलदाराकडे पाठवण्यात येते. तहसीलदार अर्जाची नोंदणी करून सर्व कागदपत्रे जमा करून घेतो.
- सर्व गोष्टीची पडताळणी झाल्यानंतर अर्जदार हा योजनेस पात्र आहे की नाही ते पाहिल्यानंतर हा अर्ज समितीसमोर ठेवण्यात येतो.
अर्जाची समितीद्वारे निवड केली जाते व लाभार्थ्याला रक्कम देण्यात येईल का नाही हे ठरवले जाते. जर अर्ज मंजूर झाला नाही किंवा मंजूर झाला तर अर्जदाराला त्या गोष्टीची कल्पना असावी यासाठी अर्जाबद्दल माहिती अर्जदारास देणे आवश्यक आहे.
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अर्ज