ठक्कर बाप्पा योजना l Thakkar Bappa Yojana
सामाजिक न्याय विभागातर्फे दलित वस्ती कार्यक्रमाच्या धर्तीवर शासनाने ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा (Thakkar Bappa Yojana) हा एकात्मिक कार्यक्रम राबवण्याची मंजुरी 2004 ते 2005 पासून देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अंतर्गत आदिवासी गावांना आणि वस्त्यांना स्वतःच्या सामूहिक विकासासाठी आणि वैयक्तिक किंवा कौटुंबिक लाभासाठी योजना राबवण्यात येतात.
![Thakkar Bappa Yojana](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/08/Thakkar-Bappa-Yojana-1024x576.jpg.webp)
ग्रामीण स्वच्छता अभियान, आदिवासींसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, असे विविध कार्यक्रम आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रमांमध्ये (Thakkar Bappa Yojana) समावेश करण्यात येतात.
Table of Contents
ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरणाची सोय करणे, प्रत्येक मार्गावर मार्गदीप बसवणे, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करून देणे, समाज मंदिरे बांधून देणे, घरे बांधून देणे, अंतर्गत रस्त्यांसाठी सुधारणा करणे, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, आरोग्यविषयक लोकांना माहिती देणे व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे अशा अनेक प्रकारच्या सुविधा शासनास ने प्रशासकीय विभागातर्फे राबविण्यात येत आहेत.
आदिवासी वस्ती सुधारणा द्वारे जी कामे द्यायचे आहेत, त्या कामांची अंमलबजावणी अधिकाऱ्यांमार्फत योग्य तऱ्हेने होईल की नाही याची दक्षता घेऊन ही कामे कशी ठराविक वेळेत पूर्ण होतील याचा विचार करण्यात आला.
परिणामी या योजनेचा उद्देश सफल करण्यासाठी योजनेसंबंधी एकत्र कार्यप्रणाली असावी म्हणून आदिवासी विकास विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रम आणि योजना मागासवर्गीय कल्याण या विकास शीर्षाखाली अंतर्गत करून त्याची सर्व जबाबदारी संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांकडे राहील व त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थितपणे पार पडेल हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रकल्प अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक अधिकाऱ्याच्या मदतीने सर्व कामांची अंमलबजावणी व्यवस्थित होते का याची पाहणी करावी व प्रचलित कार्यपद्धतीनुसार तांत्रिक आणि प्रशासकीय संबंधी जे काही निर्णय आहे ते योग्य त्या पातळीवर घेण्यात यावेत.
या योजनेची जबाबदारी अप्पर आयुक्त आदिवासी विकास यांच्याकडे राहील. अप्पर आयुक्त आदिवासी विकास त्यांच्यावर नाशिक यांचे थेट नियंत्रण राहील. असा शासनाचा निर्णय या योजनेसंबंधी घेण्यात आला आहे व त्याप्रमाणे या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते.
योजनेचा उद्देश –
- प्रत्येक मार्गावर मार्गदीप बसवणे.
- पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करून देणे.
- समाज मंदिरे बांधून देणे.
- ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरणाची सोय करणे.
- घरे बांधून देणे.
- अंतर्गत रस्त्यांसाठी सुधारणा करणे.
- लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे.
- आरोग्यविषयक लोकांना माहिती देणे व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे.