पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना | Environmental balanced rich gram plan
18 ऑगस्ट 2010 मध्ये ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाद्वारे पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना (Environmental balanced rich gram plan) राबवण्यात आली.
![Environmental balanced rich gram plan](https://growthackmarathi.com/wp-content/uploads/cwv-webp-images/2023/08/Environmental-balanced-rich-gram-plan-1024x576.jpg.webp)
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गावामध्ये शास्वत विकास घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.
Table of Contents
ग्रामीण विकास करण्यासाठी प्रशासकीय तांत्रिक आणि आणि आर्थिक शासनाच्या मदतीने द्वारे लोकांमध्ये भौतिक सामाजिक आणि उत्पन्नाच्या दृष्टीने विकास घडवून आणण्याचे काम सुरू करण्यात आले.
ज्या वेळी ग्रामविकास करण्याची वेळ येते, त्यावेळी त्यासाठी मूलभूत भौतिक विकासा बरोबरच नैसर्गिक संपत्तीचा समतोल राखणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणून नैसर्गिक संपत्तीचा समतोल राखून आणि लोकांच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचे महत्वपूर्ण कार्य आहे.
दिवसेंदिवस आपण पाहत आहे की नैसर्गिक आपत्ती खूप वाढत चालली आहे आणि नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊ लागले आहे.
ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या विषयास सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण वाढणे, लोकांचे आजार वाढणे, पावसाची अनियमितता, हवामान बदल या सर्व गोष्टी ग्लोबल वार्मिंग मुळे होत आहेत. याचे मूळ कारण म्हणजे नैसर्गिक संपत्तीचा घट होऊ लागला आहे. ज्यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडू लागले आहे.
यासाठी आपल्याला या सर्व गोष्टीतून बाहेर पडायचे असेल तर आपल्याला पर्यावरणाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पर्यावरणाचे म्हणजेच पाण्याचा व्यवस्थित वापर करणे, झाडे लावणे, कमीत कमी प्रदूषण, प्राण्यांचे संरक्षण करणे या सर्व बाबींचा विचार करून Environmental balanced rich gram plan द्वारे पर्यावरण संतुलित ग्राम विकास करण्यात येत आहे.
पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सध्या सर्वजण पर्यावरण सुधारणा करण्यासाठी आणि पर्यावरणहाणी कमीत कमी नुकसान व्हावे याकडे जास्त भर दिला जात आहे. जेणेकरून पृथ्वीचे संतुलन टिकून राहिल आणि मनुष्यासाठी पृथ्वीवर निसर्ग चक्र सुरळीत चालू राहील.
पर्यावरणाचा विचार करून आणि ग्राम सुधारणा करण्यासाठी शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना (Environmental balanced rich gram plan) 2010-11 मध्ये सुरू केली. याचा एकच उद्देश म्हणजे पर्यावरण संतुलित ठेवून, गावाचा व्यवस्थितपणे विकास करणे.
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना या योजनेचे प्रामुख्याने खालील उद्दिष्टे आहेत –
उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांचा विकास करून पर्यावरण समतोल घडवून आणणे आणि यामध्ये लोकांचा सहभाग वाढवणे.
इको फ्रेंडली विलेजची संकल्पना राबवून आणि पर्यावरण संतुलित राखून ग्रामीण लोकांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे.
ग्रामीण क्षेत्रातील विविध विभागांना एकत्र करून सर्व योजनांची व्यवस्थित सांगड घालून समन्वयाने एकत्रित काम करणे. जिथे नवीन योजनांची किंवा उपक्रमांची गरज आहे तिथे नवीन कार्यक्रम किंवा योजना सुरू करून ग्रामविकास घडवून आणणे आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करणे.
ही सर्व कार्ये व्यवस्थित पार पडण्यासाठी आणि सर्व कामांवर विभागांमध्ये लक्ष ठेवण्यासाठी मोठ्या ग्रामपंचायतींना एक विकास केंद्र म्हणून घोषित करून हा कार्यभार सांभाळून ग्रामीण विकास घडवण्याचा आणि पर्यावरण संतुलित राखण्याचा प्रयत्न सरकारतर्फे करण्यात आला आहे.
अशाप्रकारे पर्यावरण संतुलित ग्राम योजना (Environmental balanced rich gram plan) ही योजना राबवण्यात आली आहे. ज्यामध्ये सरकारचा महत्वाचा उद्देश म्हणजे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि त्यासोबत ग्रामीण विकास घडवून आणणे. तुम्हाला हि माहिती उपयुक्त वाटत असेल ना इतरांना सांगायची असेल तर तुम्ही जरूर महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या विकासाबद्दल माहिती द्या आणि सर्वांना शेअर करा.
Environmental balanced rich gram plan ही माहिती सर्वांना शेअर करा जेणेकरून इतरांना ही ह्या माहितीचा लाभ घेण्यास मदत होईल.